रुई चे पान -जैवविविधतेसाठी "विषारी रेस्टॉरंट"

जैवविविधतेसाठी "विषारी रेस्टॉरंट" असलेल्या रुई चे पान तोडतायं...घ्या काळजी फुलपाखरांची. - भगवान हनुमान व शनी देव यांना प्रिय असलेली रुईची पाने व फुलं यांचा हार बनवून मोठया प्रमाणात भाविक हनुमान व शनी देवास व इतर दिवशी ही विधीत अर्पण करतात. रुई ची झुडूप सर्वत्र व विपुल मात्रेत आढळत असले तरी त्या पानांच्या खालच्या बाजूस बऱ्याचदा विविध फुलपाखरे यांची अंडी व कोष असतो व ही पाने तोडल्याने सदर फुलपाखरांची अंडी व कोष धोक्यात येऊन त्याचा जीवनक्रम पूर्ण होण्याआधीच संपतो व पर्यावरणाच्या आरोग्याचे सूचक असलेले फुलपाखरे हळूहळू नष्ट होत आहे,त्यात हे ही एक कारण असल्याचे सिल्लोड येथील जैवविविधता संशोधक व संवर्धक डॉ.संतोष पाटील यानी यावर विशेष अध्ययन केले आहे.कॉमन टायगर,प्लेन टायगर,स्ट्रीप टायगर ,ब्लू टायगर, ग्लोसी टायगर, मोनार्क आदी प्रजातींची फुलपाखरे फक्त रुई वर च पांनाच्या खालच्या बाजूस खूप सूक्ष्म अंडी घालतात, कोष ही विकसित होतो व अळी च्या अवस्थेत ही फुलपाखरं रूई ची विषारी पाने खाते व पुढे त्याचे उडणारे फुलपाखरूत रूपांतर होते.रुईवर खूप मोठी जैवविविधता अवलंबून असते. वर्षभर फुलं असणाऱ्या या फुलांवर जांभळा शिंजिर,सूर्यपक्षी-सन बर्ड हमखास मकरंद प्राशन करतात. ब्लॅक वुड पेकर जातीचे भुंगे यांचे हे तर आवडते मकरंद. अनेक मुंग्या ही यावर उपजीविका करतात. काळे भुंगे रुई वर गर्दी करतात तर त्या भुंग्याची शिकार करायला सरडे तिथे टपून बसतात व सरड्याला टिपण्यासाठी कावळे रुई वर लक्ष ठेवून असतात. रुईच्या फुलांतील पराग शोषणाऱ्या प्रजाती-शिंजिर, सनबर्ड, काळे भुंगे, सोनेरी पंखाचे काळे भुंगे हे पक्षी व कीटक तर फॉरगेट मी नॉट, लिटल टायगर पिरॉल, ट्रान्सपरंट पिरॉल,प्लेन टायगर, स्ट्रीप टायगर, ग्रे पॅसी, आदी फुलपाखरे ,पतंग,,काही मुंग्या व त्यावर आधारित सरडे,पाली यांना भक्षण करणारे कावळे, मुंगूस ,साप व 13 प्रकारची कीड 10 ते 12 प्रजातींचे व्हिजिटर्स वन्यघटक ई प्रजातींची नोंद डॉ पाटील यांनी केली आहे. *रुई ही औषधी गुणाने युक्त असलेली मात्र अति विषारी वनस्पती आहे. हीच्या पाना -फुलात कॅल्शिट्रोपीन ,कार्डीयाक ग्लायको साइड विषारी तत्व असून ते कॉमन टायगर व इतर चार प्रकाराचे फुलपाखरे ते खाऊन स्वतःला विषारी बनवतात .त्यांच्या जवळ गेल्यास त्यांच्या शत्रूस ती विषारी जाणीव ही होते व ही फुलपाखरं पक्षी व इतर जीवांनी खाल्ली तर त्यांना लगेच उलटी होते व ते पुन्हा यांच्या वाटेस ही जात नाही ही निसर्गाची "डिफेंस सिस्टिम" आहे.उन्हाळ्यात जेव्हा कुठे ही पराग नसतो तेव्हा ही वनस्पती संजीवन ठरते म्हणून ती घराजवळ कुठे असली तर बिन उपयोगी व विषारी म्हणून उपटून न टाकता जोपासावी व पानांची खालची बाजू बघून घ्यावी व ज्या रुई वर कुरतडलेली पाने दिसतील त्यावर हमखास सदर फुलपाखरांचा अधीवास असल्याने तिची पाने ,फुले तोडू नये. @डॉ. संतोष पाटील, सिल्लोड@

Comments

Popular posts from this blog

कोणत्या झाडाचा उपयोग कोणते पक्षी कसा करतात?

गणपतीच्या पुजनासाठी लागणाऱ्या २१ प्रकारच्या वनस्पतींची पत्री ( पाने )त्यांचे औषधी गुणधर्म

खाज कुहिली उपयोग व गुणधर्म