Posts

Showing posts from 2022

@निसर्गाचे करू संरक्षण,वाचवू साप आणि मानवी जीवन @

Image
 (श्रावण महिना सुरू झाला आहे.श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी फक्त आपण नागाला पूजनीय मानतो.पण इतर दिवशी तो आपला दुष्मन म्हणून सारे लोक पाहतात. साप हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून संबोधले जाते, सापाविषयी डॉ. संतोष पाटील जैवविविधता अभ्यासक ,सिल्लोड-औरंगाबाद यांनी लिहिलेले लेखन आपणा पर्यावरण अभ्यासकांना व इतर लोकांना उपयुक्त ठरेल. असा विश्वास वाटतो. डॉ. पाटील यांनी लिहीलेले लेखन येथे माहितीसाठी प्रसिद्ध करीत आहे.वरील सापांची छायाचित्रे सर्पमित्र अनिकेत चोपडे,पेढे-चिपळूण यांनी स्वतः click केली आहेत.)            १ ) साप हा निसर्गाच्या अन्न साखळीतील महत्त्वाचा दुवा आहे.घुस ,उंदिर आदी उपद्रवी प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी सापाची भूमिका महत्त्वाची आहे.या व्यतिरिक्त  बेडूक,सरडे ,पाली ,इतर लहान कीटक हे ही सापाचे अन्न असल्याने त्यांची संख्या मर्यादित राहते. उंदीर शेतमालाचे खूप नुकसान करतात व उंदिर संपवून साप शेतकऱ्यांना मदत करतात म्हणून त्यांना शेतकरी मित्र समजले जाते. तो जैवविविधतेचा महत्वाचा घटक आहे.सापा बद्द्ल अनेक अंधश्रद्धा व गैरसमज आहेत.या गैरसमजा पायी मानवी वस्तीत आल

विनाशाच्या उंबरठ्यावर- एक मखमली सौंदर्य अन जैवविविधता- *मृगाचा किडा..rain bug, रेन बग

Image
 (मी लहानपानापासून या मृगाच्या किड्याला पहात आलेलो आहे,शाळेच्या परीक्षा संपल्यावर मित्रांसोबत गावातच फिरत असू,त्या वेळेस नजरेस पडायचा,त्याचा रंग पाहून कोणासही भुरळ पडेल असा हा मृग किडा.हा नाजूक ,लाजाळू किडा काय खात असेल याचा पत्ता मला आजपर्यंत लागला नव्हता. अनेक जेष्ठमाणसांना विचारले त्याचे समाधानकारक उत्तर मिळाले नव्हते. ते आज मला डॉ. संतोष पाटील ,अभिनव प्रतिष्ठान,औरंगाबाद यांच्या सोशल मीडियावर आलेली पोस्ट वाचनात आली त्यातून मला हवी असणारी उत्तरे मिळाली.आणि मला आनंद झाला .आपणा पर्यावरण प्रेमींसाठी व इतर वाचकांसाठी ही माहिती मिळावी यासाठी ब्लॉगवरून share करीत आहे.)                नेमेची येतो पावसाळा अन त्या सोबत येतात बेडकांचे ड्राव,ड्राव,पावशा पक्षाचे पेरते,पेरते व्हा... हा एका सुरात सतत येणारा आवाज, रात्री सुध्दा.  अन त्या सोबत दिसतात अनेक पावसाच्या पाऊल खुणा ...पाऊस निर्मीती ची प्रक्रिया ढगात होते...मात्र त्याची वर्दी देणारे भूतलावर अगणित वाटसरू  टपून बसलेले असतात... कधी एकदाच्या सरी कोसळतात अन आम्हीं शितकाल समाधी मधुन बाहेर येतो... जीवन चक्र पूर्ण करण्यासाठी* ...यात एक याचक आहे...

वाशिष्ठी खोरे-रमणीयता गेलीच,सुरक्षेचाही पत्ता नाही!

Image
निसर्ग संपन्न वाशिष्ठी नदीतील 8 एकरावर विस्तारलेले बेट. नदीतील फरशी पुलावरून दिसणारे विहंगम दृश्य. ( पूर्वी चिपळूण शहर हे तळ्यांचे शहर म्हणून ओळखले जात होते, ती आता चिपळूणकरांसाठी ही आठवणच राहिली आहे.  त्या तळ्यामध्ये पूर्वी  वेगवेगळ्या रंगाची कमळाची फुले  फुलायची. ज्या लोकांना कामधंदा नव्हता, त्या लोकांना कमळे फुलायची तेव्हा चिपळूण मध्ये तसेच एस.टी. स्टँड वर काही लोक ,मुले कमळाची फुले विकून पैसे मिळवीत होते.कमळाची ही फुले तालुक्यातील लोक घराघरात घेऊन जात होती. नवरात्रात देवीला वेगवेगळी फुले चिपळूणकरांना मिळायची. ते तलाव भरून तेथे अपार्टमेंट उभ्या राहिल्या. हळूहळू तळी कमी होऊ लागली. पूर्वी जास्त पाऊस झाला की प्रथम पाणी तलावात पसरायचे नंतरच चिपळूण शहरात घुसायचे.)                                  चिपळूणला 21,22 जुलै 2021 ला महापूर आला आणि  चिपळूण ची बाजारपेठ ,आजूबाजूची काही गाव पाण्याखाली गेली.सर्वांचे गोळा केलेल्या मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले.पाऊस प्रचंड झाला,पूर्ण सह्याद्री खोऱ्यातून प्रचंड पाणी चिपळूणच्या दिशेने आले,वरील बाजूस धरणे असल्याने थोडा फटका कमी बसला .या महापुराने डोंगर भाग

जागतिक पर्यावरण दिन व वाढते तापमान

            ५ जून जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी हा दिन येतो, आपण पर्यावरण प्रेमी या दिवशी काही सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून वृक्षारोपण किंवा इतर नागरिकांमधून पर्यावरणाची जनजागृती करीत असतो.2022 चा हा उन्हाळा सर्वात कडक भासला. दिवसेंदिवस तापमानात वाढ होताना दिसते आहे. शहरीकरण झपाट्याने वाढत आहे. सिमेंट रस्ते,अपार्टमेंट यांची बांधकामे ही तर तापमानात भर घालणारी साधने आहेत. सकाळी ८-९ वाजल्यापासूनच घराबाहेर पडावेसे वाटत नाही.रस्ते तापण्यास सुरुवात होते. हे सर्व आधुनिकीकरण करीत असताना झाडांची कत्तल काही कमी होत नाही. कोकणातून होणारे ४ पदरी हायवे यासाठी तर झाडांची कत्तल काही विचारू नका.ज्या हद्दीपर्यंत ठेकेदाराला झाडे तोड करण्यास सांगितले जाते त्या हद्दीबाहेरील मोठी झाडे तोड करून नेत आहेत.काय म्हणावे या हव्यासाला?             विकास करणे म्हणजे झाडे तोडून तेथे चकाचक सिमेंट रस्ते,अपार्टमेंट बांधणे नव्हे. माणूस पण असा लहरी आहे ही गर्मी वाढली की झाडे कमी झालीत,जंगले कमी झालीत अस म्हणतील पण पावसाळ्यात आपण आपल्या हाताने १ तरी झाड लावूया अस म्हणून झाड लावणार नाहीत.आपण स्वतःला विचारा की आता किती व