वाशिष्ठी खोरे-रमणीयता गेलीच,सुरक्षेचाही पत्ता नाही!
निसर्ग संपन्न वाशिष्ठी नदीतील 8 एकरावर विस्तारलेले बेट. नदीतील फरशी पुलावरून दिसणारे विहंगम दृश्य. ( पूर्वी चिपळूण शहर हे तळ्यांचे शहर म्हणून ओळखले जात होते, ती आता चिपळूणकरांसाठी ही आठवणच राहिली आहे. त्या तळ्यामध्ये पूर्वी वेगवेगळ्या रंगाची कमळाची फुले फुलायची. ज्या लोकांना कामधंदा नव्हता, त्या लोकांना कमळे फुलायची तेव्हा चिपळूण मध्ये तसेच एस.टी. स्टँड वर काही लोक ,मुले कमळाची फुले विकून पैसे मिळवीत होते.कमळाची ही फुले तालुक्यातील लोक घराघरात घेऊन जात होती. नवरात्रात देवीला वेगवेगळी फुले चिपळूणकरांना मिळायची. ते तलाव भरून तेथे अपार्टमेंट उभ्या राहिल्या. हळूहळू तळी कमी होऊ लागली. पूर्वी जास्त पाऊस झाला की प्रथम पाणी तलावात पसरायचे नंतरच चिपळूण शहरात घुसायचे.) चिपळूणला 21,22 जुलै 2021 ला महापूर आला आणि चिपळूण ची बाजारपेठ ,आजूबाजूची काही गाव पाण्याखाली गेली.सर्वांचे गोळा केलेल्या मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले.पाऊस प्रचंड झाला,पूर्ण सह्याद्री खोऱ्यातून प्रचंड पाणी चिपळूणच्या दिशेने आले,वरील बाजूस धरणे असल्याने थोडा फटका कमी बसला .या महापुराने डोंगर भाग