शासनाने कोकणासाठी "वणवा मुक्त गाव" पुरस्कार जाहीर करावा.
शासनाने कोकणासाठी “वणवामुक्त गाव “ पुरस्कार जाहीर करणेबाबत प्रति, मान. मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांसी, ग्रामविकासासाठी विविध अभियान व उपक्रम राबवीत असताना प्रत्येक गावामध्ये “ वणवामुक्त गाव ” यासारखे अभियान राबविणे आज काळाची गरज आहे. आज ग्लोबल वॉर्मिंगच्या भीषण संकटात वणव्यामुळे जंगले नष्ट होणे माणसाच्या अस्तित्वासाठी धोकादायक आहे. वणवा डोंगर व जंगल प्रदेश उजाड करतो. झाडांचा बळी घेतो. नवीन रोपे व बी नष्ट करतो. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी करतो. पाण्याचे प्रवाह कोरडे करतो. निसर्गाची व वन्यजीवांची अपरिमित हानी होते यात अनेक दुर्मिळ प्रजाती नष्ट होतात. ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. किंबहुना वणवा विझविण्यासाठी गेलेल्या व्यक्तींची जीवितहानी सुद्धा नोंदविण्यात आलेली आहे. कित्येक बागायतदार मोठय़ा मेहनतीने खूप मोठाले खर्च करून आंबा, काजू, सीताफळ, साग, बांबू, इ. लागवड करतात. त्यात त्यांना यश येऊ लागले आहे असे वाटावे, तोपर्यंत वणव्यांनी त्या बागेचा कोळसा झालेला पाहण्याची वेळ अनेकांवर आली आहे. वृक्षच आहेत वसुंधरेचा प्