@निसर्गाचे करू संरक्षण,वाचवू साप आणि मानवी जीवन @
(श्रावण महिना सुरू झाला आहे.श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी फक्त आपण नागाला पूजनीय मानतो.पण इतर दिवशी तो आपला दुष्मन म्हणून सारे लोक पाहतात. साप हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून संबोधले जाते, सापाविषयी डॉ. संतोष पाटील जैवविविधता अभ्यासक ,सिल्लोड-औरंगाबाद यांनी लिहिलेले लेखन आपणा पर्यावरण अभ्यासकांना व इतर लोकांना उपयुक्त ठरेल. असा विश्वास वाटतो. डॉ. पाटील यांनी लिहीलेले लेखन येथे माहितीसाठी प्रसिद्ध करीत आहे.वरील सापांची छायाचित्रे सर्पमित्र अनिकेत चोपडे,पेढे-चिपळूण यांनी स्वतः click केली आहेत.) १ ) साप हा निसर्गाच्या अन्न साखळीतील महत्त्वाचा दुवा आहे.घुस ,उंदिर आदी उपद्रवी प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी सापाची भूमिका महत्त्वाची आहे.या व्यतिरिक्त बेडूक,सरडे ,पाली ,इतर लहान कीटक हे ही सापाचे अन्न असल्याने त्यांची संख्या मर्यादित राहते. उंदीर शेतमालाचे खूप नुकसान करतात व उंदिर संपवून साप शेतकऱ्यांना मदत करतात म्हणून त्यांना शेतकरी मित्र समजले जाते. तो जैवविविधतेचा महत्वाचा घटक आहे.सापा बद्द्ल अनेक अंधश्रद्धा व गैरसमज आहेत.या गैरसमजा पायी मानवी वस्तीत आल